मुंबईकरांसाठी लोकल प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ‘मुंबई शहरी परिवहन प्रकल्प ३ ब’ (MUTP-3B) अंतर्गत पनवेल-वसई उपनगरीय रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली आणि विरारपर्यंत होण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल.
पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकलसेवा सुरू झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल घडणार आहे. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्ग जोडणारा हा दुवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाढत्या गर्दीवरही नियंत्रण मिळवता येईल.
मुंबई लोकल अधिक अद्यावत करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात असून, त्यातील हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच अधिक वेगवान आणि सोयीस्कर लोकल प्रवासाचा लाभ मिळणार आहे.